Maharashtra rain update : पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे..

Maharashtra rain update :महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाने जोर धरल्याने पुढील पाच दिवस राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. भारत हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रमुख चार कृषी विभागांमध्ये पावसाचा जोर वेगवेगळ्या तीव्रतेने जाणवणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.   कोकण आणि गोवा भागात […]

Mango farmers : शेतमाल निर्यातीसाठी वाशी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु होणार; आंबा शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा..

Mango farmers : भारतीय फळांमध्ये आंबा हा सर्वाधिक निर्यात होणारा शेतमाल आहे. विशेषतः अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्याला मोठी मागणी आहे. ही निर्यात अधिक प्रमाणात आणि दर्जेदार स्वरूपात होण्यासाठी वाशी येथील विकिरण प्रक्रिया सुविधा केंद्र आता पूर्ण क्षमतेने — आठ-आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये — कार्यान्वित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला […]

Loans to sugar factories : राज्यातील साखर कारखान्यांना मिळणार २१०० कोटींचे कर्ज..

Loans to sugar factories : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी खेळत्या भागभांडवलाचा प्रश्न सुटण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत 2 हजार 182 कोटी 69 लाख रुपयांचे मार्जिन मनी लोन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात सादर […]

Nafed Kanda Kharedi : नाफेडमार्फत कांदा खरेदीस सुरुवात, कांदा बाजारभाव कितीने वाढणार..

Nafed Kanda Kharedi: नाशिकसह महाराष्ट्रभर सध्या कांद्याचे दर चढउताराचे चक्र सुरू असतानाच नाफेडने रब्बी हंगामातील कांदा खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र शासनाच्या मूल्य स्थिरीकरण निधी (PSF) अंतर्गत ही खरेदी आज सोमवार दिनांक १ जुलैपासून सुरू झाली असून, राज्यातील निवडक सहकारी संस्था व कृषी संस्था यांच्यामार्फत कांदा खरेदी केली जात आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात स्थैर्य येण्याची […]

Onion subsidy : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुजरातच्या कांदा शेतकऱ्यांना २०० रुपये अनुदान?

Onion subsidy : सध्या बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने गुजरात सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रतिक्विंटल २०० रु ची आर्थिक मदत जाहीर केली आहे, जी जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यंत असेल. दरम्यान लवकरच होणारी गुजरात राज्य विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय तेथील सरकारने घेतल्याचा आरोप शेतकरी संघटना आणि […]

Kharif season : खरीपासाठी शासन सज्ज; खते-बियाणांसाठी स्वतंत्र यंत्रणा, नुकसानभरपाईही देणार…

Kharif season : यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसामुळे राज्यभरात खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, पेरणीपूर्व तयारीपासून संभाव्य नुकसानीपर्यंत सर्वच पातळीवर यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी यंदा वेगळी यंत्रणा उभारली आहे. […]

Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता लवकरच खात्यात जमा होणार..

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेच्या पुढील हप्त्याचा मार्ग मोकळा झाला असून, सरकारने या योजनेसाठी पुढील टप्प्यात ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘लाडकी […]

Thackeray brothers : ठाकरें बंधूंच्या आंदोलनापूर्वीच सरकार नरमले? हिंदीचा भाषेचा निर्णय फिरवला…

Thackeray brothers : मागील दोन महिन्यापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्याचे दोन जीआरही काढले, त्यासाठी स्वत: शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत माहितीही दिली. मात्र त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येत मोर्चाची घोषणा करताच सरकारने कच खाल्ली आणि निर्णय मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर […]

Accident-affected farmer : कर्त्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर या योजनेमुळे मिळतो कुटुंबाला दिलासा…

Accident-affected farmer : शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडते, कधी पूर येतो, तर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवाय, विजेचा शॉक, रस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि […]

Maharashtra rain update : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढतोय, विदर्भात पावसाची शक्यता जास्त, मराठवाड्यात मात्र विश्रांती..

Maharashtra rain update : भारतीय हवामान विभागाने काल २९ जून रोजी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिननुसार महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल समाधानकारक असून, संपूर्ण देशात मान्सून ८ जुलैपूर्वीच म्हणजे २९ जून रोजीच पूर्णपणे सक्रिय झाला आहे. सामान्यतः हा कालावधी ८ जुलैचा असतो. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची स्थितीसध्या मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे. आज ३० जून रोजी काही ठिकाणी […]